मान्सूनच्या प्रतिक्षेत सारा महाराष्ट्र आहे. पण मान्सूनचा प्रवाह अरबी समुद्रावर कमकुवत झाल्याचं पाहायला मिळतं. मान्सून अरबी समुद्रातच रेंगाळला असल्यामुळे राज्यात पावसाचे अद्याप काहीही संकेत नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस झाला. पण तोही हवा तसा झाला नाही. किमान सहा दिवस पाऊस लांबला आहे. यंदा पाऊस भरपूर आहे असे सांगितले जात होते. पण ह्या अचानक घडामोडींमुळे पाऊस कमी पडेल. मान्सून कमकुवत झाल्याने, हंगामासाठी देशभरातील पाऊस ३८% कमी होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या मध्यवर्ती भागांमध्ये अँटी-चक्रीवादळाची उपस्थितीसुद्धा मान्सूनच्या प्रगतीसाठी चांगले लक्षण नाही.
215 Total Likes and Views