मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी निशाणा साधला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी केलेल्या बंडखोरीनंतर सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. अंधारे ठाकरे गटात आल्यानंतर त्या सातत्याने शिंदे गटातील नेत्यांवर टीका करत आहेत. यावरून पाटील यांनी त्यांना खडेबोल सुनावले आहे.
सुषमा अंधारे तीन महिन्यापूर्वीच पक्षात आल्या असून ते तीन महिन्यांचे बाळ असल्याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. चोपडा मतदार संघातील धानोरा गावात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा योजनेचा भूमीपूजन सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते.
सुषमा अंधारे या जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांची पहिलीच सभा मंत्री गुलाबराव पाटील यांचे होमटाऊन असलेल्या धरणगाव शहरात होत आहे. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता सुषमा अंधारे या तीन महिन्यापूर्वीच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत आल्या आहेत. ते तीन महिन्याचं बाळ आहे, सुषमा अंधारे यांना बाई म्हणत, या बाईने बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर केलेली टीका तसेच हिंदू देवतांवर त्या काय काय बोलल्या आहेत. त्याच्याही क्लिपा दाखवाव्यात, अन्यथा आम्ही आमच्यावर केलेल्या टीका आम्ही सहन करणार नाही असा इशारा पाटील यांनी दिला..
दरम्यान आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता मिटला आहे. रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे, यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा हे दोघेही मित्र आहेत. त्यांनी समजून घेतलं पाहिजे हीच आपली भावना होती, नेत्याच्या बैठकीत त्यांनी समजून घेतलं आणि निर्णय घेतला. यातून लोकांचा सभ्रम दूर करण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांनी केला, असे पाटील म्हणाले .
162 Total Likes and Views