भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची आज पुण्यतिथी. १९६५ च्या भारत-पाक युद्धानंतर रशियातील ताशकंदमध्ये पाकिस्तानसोबत शांती करार करण्यात आला. मात्र करारानंतर जवळपास १२ तासांनी त्यांचा मृत्यू झाला. पोस्टमार्टमही करण्यात आलं नाही. त्यामुळे हा खरंच हा हार्ट अटॅक होता का? हे आज ६० वर्षे उलटूनही कोडे आहे. ११ जानेवारी १९६६ ला लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू हार्ट अटॅकनी झाल्याचं जाहीर झालं. मात्र त्यांचं ना ताश्कंदला पोस्टमार्टम करण्यात आलं ना भारतात. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला, याची अधिकृत माहिती अजूनही कुठेही नाही. शास्त्रींजींचं पोस्टमार्टम का केलं नाही? काय भानगड होती?
शास्त्रीजीनी आपले वैयक्तीक सचिव जेएन सहाय यांना ताश्कंद करारावर भारतातून काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घेण्यास सांगितले होते. रिसेप्शन पार्टीतून आल्यानंतर त्यांनी आपल्या घरी फोनवर बातचीत केली आणि त्यांना ताश्कंद कराराविषयी सांगितले. तेव्हा त्यांच्या मुलीने या करारावर नाराजी दाखवली. शास्त्रीजींनी पत्नी ललितासोबत बोलण्याची इच्छा दर्शवली. पण त्या फोनवर बोलायला आल्या नाहीत. शास्त्रीजींच्या या करारावर खरंच घरचे नाराज होते? आपला देश या निर्णयाविरोधात राहणार याचे शास्त्रीजींना टेन्शन आले असेल का?
शास्त्रींजींचं पार्थिव भारतात आणण्यात आलं तेव्हा त्यांची पत्नी ललिता शास्त्रींना पार्थिव शरीर निळे पडल्याचे दिसले. हा सामान्य मृत्यू नाही तर त्यांनी विष देण्यात आल्याचा त्यांनी आरोप केला. त्यांच्या दोन मुलांना त्यांच्या डोक्यावर पांढरा मार्क आणि त्यांच्या पोटावर दोन कट मार्क दिसले होते. शास्त्रींच्या घरच्यांनी त्यांच्या पोस्टमार्टमचीही मागणी केली होती मात्र पोस्टमार्टम करण्यात आले नाही. त्यामुळे ही हत्या होती का? हा प्रश्न आजही भारतीयांना सतावतो आहे.
938 Total Likes and Views