लोकसभेच्या निकालानंतर महायुती आणि मविआत फुट?

लोकसभा निवडणूका पार पडल्या. इतक्यात नव्या निवडणूका महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्यात. विधान परिषदेच्या चार जागा रिक्त झाल्यात. या जागेंवरून राजकीय वातावरण तापलं आहे. मनसेनं लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. आता मात्र राज ठाकरेंनी गेअर बदलल्याचं पहायला मिळतंय. राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केला आहे, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील दोन्ही […]

Read More

येतोय कडक लॉकडाउन

तीन आठवड्याचा कडक  लॉकडाउन लावण्याचा   महाराष्ट्र सरकार विचार करीत आहे.  मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे  यांनी या संबंधात विचार करण्यासाठी उद्या  एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.  देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांनाही  बैठकीला बोलावले आहे.  आपत्ती व्यवस्थापन खात्याचे मंत्री  विजय वडेट्टीवार यांनीही कडक लॉकडाउनचे संकेत दिले.   सध्या  कडक निर्बंध आणि  शनिवार-रविवार विकेंड लॉकडाउन असतानाही करोनाचे  पेशंट वाढत आहेत.  […]

Read More

SAY NO TO LOCKDOWN !!! – सचिन पावगी

स्वतः जागे व्हा!इतरांना जागं करा! बहुसंख्य लोकांच्या बुद्धीवर काबू मिळवण्यात ही सगळी राजकारणी मंडळी, मिडिया, सगळेजण यशस्वी झाले आहेत हे मात्र नक्की. त्यामुळेच बहुसंख्य लोक हे असलं काहीतरी बडबडायला लागले आहेत…कोरोना पुन्हा वाढतोय हां!…दुसरी लाट आलेय आता!…खूपच घातक आहे हां ही महामारी!…2024 पर्यंत हे असंच चालणार!…वगैरे वगैरे…या बुध्दीमान लोकांच्या हे का लक्षात येत नाहीये की […]

Read More

भारतात लाॅक डाऊनची गरज काय ?

भारतात ३३ कोटी देव असताना लाॅक डाऊन कशासाठी ?भारतातली जनता ८०% देव भोळी आहे… भारतात देव नवसाला पावतात! संकटकाळी धाऊन येतात !भारतात सुखकर्ते /दुखहर्ते भारतात असतांना लाॅक डाऊन येवढे दिवस का. ? भारतातले ८०% टक्के लोक आस्तिक आहेत. भारतात देव जर नाकातुन, कानातुन, बेंबीतुन ,मटक्यातुन, खांबातुन, खिरीतुन, पायातुन, माशाच्या/ मगरीच्या पोटातुन, जमीनीतुन , बिना आई […]

Read More

आणखी किती शहीद हवेत? माओवाद्यांना ठेचणार तरी कसे?

छत्तीसगडने  पुन्हा एक महाभयंकर माओवादी हल्ला पाहिला. विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल  शनिवारी  भर दिवसा पेटले.   माओवाद्यांशी झालेल्या   सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलाचे तब्बल २२  जवान मारले गेले.  जोनागुंडाचा  हा डोंगराळ भाग  माओवाद्यांचा मोठा अड्डा आहे. कुख्यात  हिड्मा मडावी  इथे असल्याची माहिती मिळाल्यावरून   मोठे ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. काहीतरी गडबड झाली.  जवान घेरल्या गेले.  देश हादरला. […]

Read More

अजगराच्या पोटात अख्खा देश -ज्ञानेश वाकुडकर

एखाद्या अजगराच्या पोटात बकरी असावी आणि ती वर्षानुवर्षे जिवंत असावी, असा काहीसा चमत्कार या देशात ओबीसी – बहुजनांच्या बाबतीत सुरू आहे ! बकरी तांत्रिक दृष्ट्या मेलेली नाही, पण तशी ती जिवंत असूनही फायदा नाही. कारण तिचं सारं जगणं अजगराच्या हातात आहे. एका अजगराच्या पोटात असाच एक अख्खा देश हजारो वर्षापासून सांगण्यापुरता जिवंत आहे. ह्या देशात […]

Read More

सारे विद्यार्थी पास, पण गुणवत्तेचे काय?

         महाराष्ट्र सरकारने आज एक मोठा निर्णय जाहीर केला.    पहिली ते आठवीपर्यंतचे सारे विद्यार्थी  पास केले.  ह्या विद्यार्थ्यांना थेट  पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे.  वर्षभरापासून करोना धुमाकूळ घालतो आहे. गेल्या वर्षी मुलांना असेच प्रमोट केले होते. या वर्षीही असेच झाले.  करोनामुळे  शाळा होऊ शकत नाहीत, अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे परीक्षा घेऊ शकत नाही.  […]

Read More

लक्षणे दुर्लक्ष केल्याने वाढतोय करोना

देशात करोनाचे टेन्शन आहे.  महाराष्ट्रात तर  परिस्थिती आहे. नागपुरात तर  आरोग्य व्यवस्थाच ऑक्सिजनवर असल्याने  रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारीच काय खासगी रुग्णालयेही हाउसफुल्ल  आहेत.  खाटा  नाहीत. ऑक्सिजनसाठी धावाधाव. तहान लागल्यावर सरकारने विहीर खोदायला घेतल्याने   सारेच हतबल आहेत.   दुसरी लाट येऊ शकते  हे माहित होते. ऑक्टोबरमध्ये   पेशंट कमी झाले होते. पण  ६ महिने […]

Read More

ममता वाराणशीहून लढणार २०२४ मध्ये

२०२४च्या लोकसभा निवडणुकांना  बराच वेळ आहे.  पण  आतापासूनच   रणशिंग फुंकायला  सुरुवात झाली आहे.  तृणमूल कॉन्ग्रेसच्या सुप्रीमो ममतादीदी  २०२४मध्ये  वाराणशीहून लढू शकतात असे एक पिल्लू कुणीतरी सोडून दिले. सोशल मिडीयावर त्याचीच जोरदार चर्चा सुरु आहे.   सध्या पश्चिम बंगाल निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.  एकूण ८ टप्प्यात  तिथे मतदान होत आहे.   ममता नंदीग्राममधून उभ्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात नंदीग्रामचे […]

Read More