वाझेंनी परमबीर सिंगांना खाल्ले

सचिन वाझे खूप लोकांना खाणार आहे. तो स्वतः तर बुडणारच. पण  अनेकांना घेऊन बुडणार आहे. आज पहिली विकेट गेली.  त्याचा बॉस मुंबईचे  पोलीस आयुक्त परमबीर सिंग  यांना   उद्धव सरकारने  हटवले.  त्यांच्या जागी पोलीस महासंचालक   हेमंत नगराळे यांना आणले आहे.    पोलीस कोठडीतील एका मृत्यू प्रकरणात  १६ वर्षापूर्वी   वाझेला  निलंबित करण्यात आले होते.  त्यासंबंधी अजूनही कोर्टात खटला […]

Read More

का टोचत नाही लशी?

महाराष्ट्र सरकार व्यवस्थित चालले आहे. सारे आलबेल आहे  असे  राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार म्हणत असले तरी   मोदी सरकारला ते  मान्य नाही.  करोनाची दुसरी लाट रोखण्यात  महाराष्ट्राचे प्रशासन गंभीर नाही असा ठपका     ठेवत  केंद्रीय आरोग्य सचिवाने प्रशासनाला  ठोकून काढले. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना  आरोग्य सचिवाने   तसे पत्रच लिहिले.  रुग्णांचा तपास लावण्यापासून तो   चाचण्या  वाढवणे,  […]

Read More

सचिन वाझे ह्या सरकारला खाणार?

प्रसिध्द उद्योगपती   मुकेश  अंबानी  यांच्या घराजवळ गेल्या महिन्यात जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉरपियो  कार मिळाली.  नक्कीचे हे प्रकरण गंभीर होते. पण ते एवढे पेटेल असे वाटले नव्हते. पण पेटले.  ह्या प्रकरणाचा तपास करणारा  सचिन वाजे हा  पोलीस  सब इन्स्पेक्टर कोठडीत  आहे.  आगीच्या ज्वाळा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोचू पाहत आहेत.  भाजपने थेट मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची […]

Read More

नागपूरकर आजपासून सात दिवस घरीच

करोना बाधितांची वाढती संख्या  लक्षात घेऊन  नागपुरात  आजपासून सात दिवस कडक लॉकडाउन    लावण्यात आला आहे.  अत्यावश्यक काम नसल्यास  नागरिकांना घरातच थांबायला सांगण्यात आले आहे  या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.   मात्र विनाकारण फिरणाऱ्या  नागरिकांची दिवसभरासाठी    पोलीस कोठडीत रवानगी केली जाणार आहे.                       गर्दी टाळा असे आवाहन प्रशासनाने वारंवार करूनही लोक ऐकत नव्हते.  गर्दी करीत […]

Read More

भाजपला राष्ट्रपती राजवटीचे डोहाळे

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर  दुसऱ्याच दिवशी    विधानसभेतील विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश  भाजपचे अध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी  नागपूर गाठले.  सरसंघचालक  मोहन भागवत  यांची भेट घेतली.  त्यांच्यात तब्बल अर्धा तास  दार  बंद करून चर्चा झाली.   या भेटीत काय शिजले ते कळायला मार्ग नाही.  पण शिजवायला भाजपच्या हाती आता डाळ-तांदूळ आहेच कुठे? ‘ऑपरेशन  लोटस’  वगैरे फोकनाड आहे.  […]

Read More

लॉकडाउन हे उत्तर नव्हे

करोनाचे पेशंट वाढत आहेत म्हणून नागपुरात  येत्या १५ मार्चपासून  सात दिवस  कडक लॉकडाउन जाहीर झाला आहे.  परिस्थिती सुधारली नाही तर  राज्यात इतरत्रही लॉकडाउन करावा लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  त्यामुळे  प्रश्न पडतो.   करोनाला मात देण्यासाठी लॉकडाउन हाच एक उपाय  आहे का?   पालकमंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेऊन  टाळेबंदी जाहीर केली.  […]

Read More

नागपुरात १५ मार्चपासून सात दिवस लॉकडाउन

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून  करोनाचे रुग्ण वाढत होते.  दररोज  एक हजारावर नव्या रुग्णांची भर पडत होती.   बुधवारी तर १७१०  नवे रुग्ण  निघाले.   शेवटी ज्याची भीती होती तेच झाले.  १५ मार्चपासून २१  मार्चपर्यंत  नागपुरात  कडक लॉकडाउन  लागू होत आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी  आज ही घोषणा केली. पालकमंत्री म्हणाले,   या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.   अत्यावश्यक दुकाने, […]

Read More

ममताने हाती घेतले हिंदू कार्ड

राजकारण भल्याभल्यांना बदलवून टाकते.   सरडाही  लाजेल इतक्या वेगाने राजकारणी रंग बदलतात.  पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पेटला आहे.  तृणमूल कॉन्ग्रेसच्या सुप्रीमो ममतादीदी यांनी आज नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरायला जाताना  शिव मंदिरात पूजा केली,  चंडीपाठ म्हटला तेव्हा   बंगालचा मतदार  चाट पडला. ही  दीदी  एवढी बदलली कशी?   कॉन्ग्रेसवाले तर जाम  वैतागले आहेत.  कोणी जय श्रीराम म्हटले तर   […]

Read More

उद्धव नाणार देणार?

        आपल्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना  कधी कुठला झटका येईल ते सांगता येत नाही.  भाजप असो की शिवसेना,   दोघांच्याही घोषणा चमकोगिरीच्या  असतात.  कोणीही कुठल्या भूमिकेवर ठाम नसतो.  सरडाही लाजेल, तशा गरजेनुसार भूमिका बदलत असतात.  एकेकाळी   बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे  गोपीनाथ  मुंडे यांनी एनरॉन म्हणजेच दाभोळ प्रकल्प    समुद्रात बुडवून टाकण्याची घोषणा केली होती. पुढे युतीची सत्ता आली […]

Read More

मोदी खेळताहेत ममतांशी जुगार

कोलकात्याच्या ब्रिगेड  मैदानावर काही लाखांची सभा घेऊन  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज  पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.  तिकडे सिलीगुडीमध्ये  महिलांची रिकाम्या सिलेंडरसह  पदयात्रा  काढून   मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉन्ग्रेसच्या सुप्रीमो  ममता बनेर्जी  यांनीही  शंखनाद  केला. पहिल्या टप्प्याच्या मतदानाला अजून २० दिवस असले तरी युद्ध पेटले आहे.  दोघांसाठीही ही आरपारची लढाई आहे. दीदीने ही निवडणूक जिंकली तर ती […]

Read More