मनसुख बुडाला की त्याला बुडवले?

आपल्याकडे माणसं  मरतात, मारली जातात, काही आत्महत्या करतात,   सेलिब्रिटी असेल तर  चर्चा होते.  पोलीस तपासात  किती जणांना मरणोत्तर न्याय मिळतो? हा प्रश्नच आहे.  अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा मुंबईतला संशयास्पद मृत्यू  थेट  बिहारमध्ये गाजला. राजपूतला ड्रग पुरवण्याच्या  आरोपात त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती  अडकली.  पूजा चव्हाण ह्या तरुणीने पुण्यात आत्महत्या केल्यामुळे   शिवसेनेच्या एका मंत्र्याला घरी बसावे लागले.  […]

Read More

राज ठाकरे मास्क घालत नाहीत हे प्रशासनाला चालते का?

करोनासंबंधीचे नियम  अतिशय   कडक आहेत. प्रत्येकाने   तोंडाला मास्क लावला पाहिजे, सुरक्षित अंतर पाळले पाहिजे  असे हे नियम सांगतात. अनेक लोक हे नियम पाळत  आहेत. ज्येष्ठ साहित्यिक  श्रीपाद भालचंद्र जोशी गेल्या एक वर्षापासून  जिन्याखाली उतरलेले नाहीत. असे अनेक आहेत. पण  आपण रस्त्यावर अनेक जण मास्क नसलेले पाहतो.  प्रशासन त्यांना दंडही ठोठावत आहे. पण मनसेचे  सुप्रीमो राज […]

Read More

श्री गजानन महाराज प्रगट दिन

माघ वद्य ७ शके १८००(२३ फेब्रुवारी १८७८)या दिवशी १८वर्षाचे गजानन महाराज शेगाव, जिल्हा बुलढाणा येथे दिगंबर अवस्थेमध्ये लोकांची दृष्टी असे मानले जाते. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठा बाहेर  उष्ट्या पत्रावळी तील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे “कोणा हा कोटींचा काहीच कळेना ब्रह्माच  ठिकाण कोण सागे। साक्षात ही आहे परब्रह्म मूर्ती। […]

Read More

संघ तेव्हा कुठे होता?

राज्यपालांच्या अभिभाषणावरील उत्तरात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.  भाजपवर बोलताना  ठाकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही घसरले.  तसे पाहिले तर  संघाचा विषय काढायची गरज नव्हती. पण काढला. संघाला झोडपणे सर्वांना  आवडते. ‘स्वातंत्र्यलढ्यात संघ नव्हता’ असे ठाकरे म्हणाले. त्यावरून राजकारण तापले आहे.  संघाचे संस्थापक सरसंघचालक    केशव बळीराम हेडगेवार हे  स्वतः   एक स्वातंत्र्यसैनिक होते, हे कदाचित […]

Read More

गुलाम नबी बंड करणार? कॉन्ग्रेस फुटणार?

जहाज बुडायला आले ते उंदरांना आधी कळते असे म्हणतात. ते बाहेर उड्या मारतात. तसे कॉन्ग्रेसचे झाले आहे.  कालपर्यंत   कॉन्ग्रेसने पोसलेले  ज्येष्ठ नेते  डोळे वटारत आहेत. गुलाम नबी ७१ वर्षांचे आहेत, आनंद शर्मा ६८ वर्षांचे आहेत.  घाटावर जायच्या वयात ह्या नेत्यांना कॉन्ग्रेसचे कसे होणार? याची चिंता पडली आहे.  दोन वर्षे होत आहेत. कॉन्ग्रेसला फुल टाइम  अध्यक्ष […]

Read More

राम मंदिरासाठी लोकांनी दिले २१०० कोटी रुपये

रामाच्या नावाने  दगडही तरंगला होता  असे आपण ऐकतो.  आता कलियुगात रामाच्या नावाने दगडच नव्हे तर मंदिरासाठी लोकांमधून पैसेही उभे होतात, तेही थोडेथोडके नव्हे  चक्क २१०० कोटी रुपये.  ही रक्कम करोनाकाळात आणि तीही फक्त ४४ दिवसात उभी झाली हे आणखी विशेष.   विश्वास बसणार नाही, पण हे  वास्तव आहे. रामनामाचा महिमा ह्या  संगणक युगातही कायम आहे.             […]

Read More

मुनगंटीवार, फडणवीस, मंडळं काय मागता? विदर्भ राज्य मागा

महाआघाडी सरकार आणि  राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांच्यातल्या लढाईने आज  भयंकर वळण घेतले.  विधानपरिषदेवर नेमायच्या १२  आमदारांच्या नावाची यादी राज्यपालांनी अडवून ठेवली आहे.  त्यामुळे महाआघाडीत अस्वस्थता आहे.  राज्यपालांनी  आमदारांची यादी अडवली म्हणून   वैधानिक  विकास मंडळांची पुनर्स्थापना अडवायची असा निर्णय  सरकारने घेतला आहे.  ही लढाई आज विधानसभेच्या आखाड्यात आली तेव्हा राजकारण उकळू लागले. पुढच्या निवडणुका २०२४ […]

Read More

उशिरा आलेला राजीनामा

अखेर   महाविकास आघाडी सरकारमधले  वनमंत्री संजय राठोड यांनी  राजीनामा दिला.  दिला म्हणण्यापेक्षा  त्यांना द्यावा लागला.  विधानसभा अधिवेशन  नसते तर हा राजीनामा आणखी लांबला असता. पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या संशयास्पद मृत्युच्या वादात अडकलेले  संजय राठोड यांनी  सुरुवातीलाच राजीनामा  दिला असता तर   उद्धव  ठाकरे सरकारच्या अब्रूचे एवढे धिंडवडे निघाले नसते.  यात  उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान झाले […]

Read More

पूजा, संजय, उद्धव ठाकरे आणि एक वाघीण…

आपला वनमंत्री संजय राठोड याचे काय करायचे?   राजीनामा घ्यायचा की चालू द्यायचे?  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड  टेन्शनमध्ये आहेत.  एवढा ताणतणाव तर त्यांना  भाजपला सोडचिठ्ठी देतानाही आला नव्हता. पूजा राठोड तर जीवानिशी गेली आणि आता महाआघाडी सरकारचा श्वास कोंडतो आहे. आता हे प्रकरण पुजापुरते किंवा संजय राठोडपुरते मर्यादित राहिलेले नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या प्रतिष्ठेचा  प्रश्न […]

Read More

हमाम मे सब नंगे

राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे हे कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय अधिकारी, स्पष्टवक्ते म्हणून प्रसिध्द आहेत.  महाराष्ट्र पोलिसांमध्ये जे ५-२५ निष्ठावान अधिकारी आहेत त्यामध्ये नगराळे हे एक आहेत.  गुरुवारी त्यांनी नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला.  त्या नंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक धक्कादायक विधान केले. नगराळे म्हणाले, ‘भ्रष्टाचार हा  केवळ पोलीस, वन व महसूल विभागातच आहे असे नाही.   […]

Read More