पवारांच्या पोटदुखीने सरकारवरचे संकट लांबले

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या अचानक उमललेल्या पोटदुखीने  महाआघाडी सरकारवरचे संकट  लांबले.    बुधवारी त्यांच्या पित्ताशयावर  शस्त्रक्रिया आहे.  रुग्णालयातून बाहेर येऊन  चालते फिरते व्हायला  १५ दिवस  आरामात लागतील.  पवार हे या सरकारचे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुठला मोठा निर्णय करणार नाहीत. पवारांच्या आजारपणात भाजपही   पूर्वीसारखा आक्रमक नसेल.   गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा […]

Read More

शरद पवार ह्या वयात गद्दार होतील?

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी    भाजपचे चाणक्य  अमित शहा  यांची गुप्त भेट  घेतल्याच्या बातमीने  खळबळ आहे.  दोन दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे ही भेट झाल्याची बातमी एका गुजराती  वृत्तपत्राने  दिली आहे.  राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी  अशी काही भेट झाल्याचा इन्कार केला.  पवारांची प्रतिक्रिया अजून आलेली नाही.  शहा मात्र बोलले. ‘राजकारणात सारं काही  सांगायचं नसतं’    असे शहा […]

Read More

पवारांना राष्ट्रपती व्हायचंय की युपीए अध्यक्ष?

                    राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार  यांना  कायम न्यूजमध्ये राहण्याची कला छान  साधली आहे.  तशी माणसे त्यांनी  ठेवली आहेत.   काहीतरी सनसनाटी  बोलून पवारांचे महात्म्य  वाढवण्याच्या खटपटीत ही माणसे असतात.  आता  आपले संजय राऊत  पहा. वाहिन्यांना बाईट दिल्याशिवाय  त्यांना करमत नाही.  शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेना युपीएमध्ये नाही. पण वकिली पवारांची करतात.  पवारांनी युपीएचे म्हणजे संयुक्त पुरोगामी  आघाडीचे […]

Read More

उद्धव ठाकरेंच्या घरात घुसला करोना

करोनाने पुन्हा धुमाकूळ सुरु केला आहे.  खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असणाऱ्या काही व्यक्ती  पॉझिटीव्ह आल्याने  प्रशासन हादरले आहे.  काही दिवसांपूर्वी  उद्धव यांचे चिरंजीव आदित्य यांना करोनाची लागण झाली होती.  आता  उद्धव यांच्या पत्नी  रश्मी  ठाकरे  ह्याही पॉझिटीव्ह  निघाल्याने  चिंता वाढली आहे.  काही दिवसांपूर्वीच  रश्मी यांनी लस टोचून घेतली होती.  ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ […]

Read More

उध्दवसाहेब, म्हातारी मरु द्या, पण गृहखात्याच्या बेशिस्तीचा काळ सोकवू देवू नका! -मधुकर भावे

महाराष्टÑातील महाआघाडी सरकारचा हा कसोटीचा काळ सुरु झालेला आहे. ‘शासना विरुध्द प्रशासन’ असा आरोप -प्रत्यारोपाचा हा खेळ महाराष्टÑाला कमीपणा आणणारा आहे. येणाºया १ मे रोजी महाराष्टÑ राज्याला ६१ वर्षे पूर्ण होतील. या ६१ वर्षांत ‘सरकार’ आणि ‘विरोधी पक्ष’ असे संघर्षांचे, ताण-तणावाचे, टोकाच्या विरोधाचे अनेक प्रसंग आले. पण समजूतदार राजकीय शहाणपणाने सरकार आणि विरोधी पक्ष त्या त्यावेळी […]

Read More

अनिल देशमुखांना वाचवण्यासाठी धावले शरद पवार

शरद पवार प्रत्येक निवडणूक  जिंकत आले. पराभव त्यांना माहित नाही. पण आज त्यांची फजिती झाली. आपले गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचवण्याची धडपड त्यांच्या अंगाशी आली. ‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या  खळबळजनक पत्रानंतर  महाआघाडी सरकार संकटात  आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांची खुर्ची  धोक्यात आहे. सचिन वाझे देशमुखांना भेटला की नाही हा कळीचा मुद्दा बनला […]

Read More

भाजपला राष्ट्रपती राजवटीचे डोहाळे

अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर  दुसऱ्याच दिवशी    विधानसभेतील विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश  भाजपचे अध्यक्ष  चंद्रकांतदादा पाटील यांनी  नागपूर गाठले.  सरसंघचालक  मोहन भागवत  यांची भेट घेतली.  त्यांच्यात तब्बल अर्धा तास  दार  बंद करून चर्चा झाली.   या भेटीत काय शिजले ते कळायला मार्ग नाही.  पण शिजवायला भाजपच्या हाती आता डाळ-तांदूळ आहेच कुठे? ‘ऑपरेशन  लोटस’  वगैरे फोकनाड आहे.  […]

Read More

विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळाल तर भस्म व्हाल

गुरुवारी   रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचा  आक्रोश पाहिला. रात्रभर झोप आली नाही. मुलांना  नोकऱ्या देऊ शकत नाही. परीक्षाही घेऊ शकत नाही.  विद्यार्थी  सत्ता मागत नव्हते.  कुठले बोर्ड किंवा कुठली आमदारकी मागत नव्हते.  परीक्षा मागत होते.  सरकारी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोग म्हणजे एमपीएससी  परीक्षा घेते.  लाखो विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षांना बसतात. नशीब आजमावतात.  गेल्या तीन वर्षात […]

Read More

उशिरा आलेला राजीनामा

अखेर   महाविकास आघाडी सरकारमधले  वनमंत्री संजय राठोड यांनी  राजीनामा दिला.  दिला म्हणण्यापेक्षा  त्यांना द्यावा लागला.  विधानसभा अधिवेशन  नसते तर हा राजीनामा आणखी लांबला असता. पूजा चव्हाण ह्या तरुणीच्या संशयास्पद मृत्युच्या वादात अडकलेले  संजय राठोड यांनी  सुरुवातीलाच राजीनामा  दिला असता तर   उद्धव  ठाकरे सरकारच्या अब्रूचे एवढे धिंडवडे निघाले नसते.  यात  उद्धव ठाकरे यांचे मोठे नुकसान झाले […]

Read More

‘मीच जबाबदार’, मग सरकार किती जबाबदार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी  जनतेशी  मोकळा संवाद  साधला. ते बोलणार म्हणजे पुन्हा लॉकडाऊन  लागणार  ह्या चिंतेने लोक दहशतीत होते. मुख्यमंत्र्यांनी तसे काही केले नाही.  आठ दिवसाचा अल्टीमेटम मात्र दिला. म्हणजे आठ दिवसात करोना कमी झाला नाही तर लॉकडाऊन येऊ शकतो. ठाकरेंनी सबुरी दाखवली. मात्र अमरावतीमध्ये मात्र तिथल्या त्यांच्या पालकमंत्र्याने  उद्या सायंकाळपासून एक आठवड्यासाठी लॉकडाऊन  […]

Read More