आमिर खानने घेतला सोशल मिडिया संन्यास

वाढदिवसाला  एखादी वाईट गोष्ट  सोडून देण्याची पद्धत आपल्याकडे आहे.  कोणी दारू सोडतो, कुणी जुगार सोडतो.  लोकप्रिय  चित्रपट अभिनेता आमिर खान याने चक्क  सोशल मिडिया सोडला.  त्याचा सोशल मिडीयाचा  संन्यास  प्रचंड गाजतो आहे.  १४ मार्चला आमिर ५६ वर्षाचा झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने आपली अखेरची पण तिरकस पोस्ट टाकली.  ‘मी खूप सक्रीय आहे, हा देखावा बंद […]

Read More

सचिन वाझे ह्या सरकारला खाणार?

प्रसिध्द उद्योगपती   मुकेश  अंबानी  यांच्या घराजवळ गेल्या महिन्यात जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉरपियो  कार मिळाली.  नक्कीचे हे प्रकरण गंभीर होते. पण ते एवढे पेटेल असे वाटले नव्हते. पण पेटले.  ह्या प्रकरणाचा तपास करणारा  सचिन वाजे हा  पोलीस  सब इन्स्पेक्टर कोठडीत  आहे.  आगीच्या ज्वाळा मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यापर्यंत पोचू पाहत आहेत.  भाजपने थेट मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची […]

Read More

नागपूरकर आजपासून सात दिवस घरीच

करोना बाधितांची वाढती संख्या  लक्षात घेऊन  नागपुरात  आजपासून सात दिवस कडक लॉकडाउन    लावण्यात आला आहे.  अत्यावश्यक काम नसल्यास  नागरिकांना घरातच थांबायला सांगण्यात आले आहे  या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत.   मात्र विनाकारण फिरणाऱ्या  नागरिकांची दिवसभरासाठी    पोलीस कोठडीत रवानगी केली जाणार आहे.                       गर्दी टाळा असे आवाहन प्रशासनाने वारंवार करूनही लोक ऐकत नव्हते.  गर्दी करीत […]

Read More

लॉकडाउन हे उत्तर नव्हे

करोनाचे पेशंट वाढत आहेत म्हणून नागपुरात  येत्या १५ मार्चपासून  सात दिवस  कडक लॉकडाउन जाहीर झाला आहे.  परिस्थिती सुधारली नाही तर  राज्यात इतरत्रही लॉकडाउन करावा लागेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  त्यामुळे  प्रश्न पडतो.   करोनाला मात देण्यासाठी लॉकडाउन हाच एक उपाय  आहे का?   पालकमंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेऊन  टाळेबंदी जाहीर केली.  […]

Read More

विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळाल तर भस्म व्हाल

गुरुवारी   रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचा  आक्रोश पाहिला. रात्रभर झोप आली नाही. मुलांना  नोकऱ्या देऊ शकत नाही. परीक्षाही घेऊ शकत नाही.  विद्यार्थी  सत्ता मागत नव्हते.  कुठले बोर्ड किंवा कुठली आमदारकी मागत नव्हते.  परीक्षा मागत होते.  सरकारी अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोग म्हणजे एमपीएससी  परीक्षा घेते.  लाखो विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षांना बसतात. नशीब आजमावतात.  गेल्या तीन वर्षात […]

Read More

जुन्या काळातील लग्न

लग्नामध्ये आहेर केल्यानंतर माईकवरून पुकारायची पद्धत होती. अमुक अमुक एक रुपया, तमूक तमूक दोन रुपये, अशा प्रकारे. ज्याचा आहेर अकरा रुपये किंवा त्याच्या वर असेल, त्याच्याबद्दल तर खूप भारी वाटायचं. त्याच्यानंतर लग्नानंतर दोन-चार दिवसातच नवरदेव त्याला लग्नात हुंडा म्हणून मिळालेला रेडिओ गळ्यात घालून, मिळालेल्या सायकलवर ऐटीत टांग टाकून आणि मिळालेले हॅंडो सँडो चे घड्याळ हातामध्ये […]

Read More

नागपुरात १५ मार्चपासून सात दिवस लॉकडाउन

मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून  करोनाचे रुग्ण वाढत होते.  दररोज  एक हजारावर नव्या रुग्णांची भर पडत होती.   बुधवारी तर १७१०  नवे रुग्ण  निघाले.   शेवटी ज्याची भीती होती तेच झाले.  १५ मार्चपासून २१  मार्चपर्यंत  नागपुरात  कडक लॉकडाउन  लागू होत आहे. पालकमंत्री नितीन राऊत यांनी  आज ही घोषणा केली. पालकमंत्री म्हणाले,   या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.   अत्यावश्यक दुकाने, […]

Read More

ममताने हाती घेतले हिंदू कार्ड

राजकारण भल्याभल्यांना बदलवून टाकते.   सरडाही  लाजेल इतक्या वेगाने राजकारणी रंग बदलतात.  पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पेटला आहे.  तृणमूल कॉन्ग्रेसच्या सुप्रीमो ममतादीदी यांनी आज नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरायला जाताना  शिव मंदिरात पूजा केली,  चंडीपाठ म्हटला तेव्हा   बंगालचा मतदार  चाट पडला. ही  दीदी  एवढी बदलली कशी?   कॉन्ग्रेसवाले तर जाम  वैतागले आहेत.  कोणी जय श्रीराम म्हटले तर   […]

Read More

मराठी भाषेसाठी राज्याच्या या अर्थसंकल्पात काही तरतूद आहे काय?

     ‘मराठी भाषेसाठी राज्याच्या या अर्थसंकल्पात काही तरतूद आहे काय? कोणाला कळले तर सांगा’  असा संदेश श्रीपाद भालचंद्र जोशी यांचा संदेश वाचला आणि मलाच माझी लाज वाटली. खरेच आपण कुठल्या महाराष्ट्रात राहत आहोत?  आपले राज्यकर्ते कुठल्या मानसिकतेचे आहेत? ‘ मंत्रालयाच्या दारात  राजमुकुट घालून परंतु अंगावर लक्तरे लेवून  मराठी उभी आहे’ अशी खंत  कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी ३० […]

Read More

आत्महत्यांभोवती फिरणे महाराष्ट्राला परवडेल?

दोन महिन्यांपासून आत्महत्या  हा विषय राज्यात गाजतो आहे.  तसे पाहिले तर दररोज  डझनाने आत्महत्या होतात. पण वेगवेगळ्या कारणाने  झालेल्या ह्या तीन आत्महत्या उद्धव सरकारच्या पाठीशी  जणू  हात धुवून लागल्या आहेत.  महाराष्ट्राचे राजकारण ह्या आत्महत्याभोवती फिरते आहे.  मृत व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे हा हट्ट समजू शकतो. पण त्यासाठी   सरकारला कोंडीत  पकडणे  राज्याला परवडणारे नाही.  राज्यापुढे करोना, […]

Read More