अनिल देशमुख आणि ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिला झटका

सीबीआय चौकशी टाळण्याची राज्याचे माजी गृहमंत्री  अनिल देशमुख यांची  धडपड अपयशी ठरली.  मुंबई  उच्च न्यायालयाच्या  आदेशाला आव्हान देणारी  त्यांची आणि महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली.    माजी पोलीस आयुक्त परमबीर  सिंग यांनी देशमुख यांच्यावर  भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मुंबई हायकोर्टाने  त्या आरोपांच्या  सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते.  देशमुख आणि  ठाकरे सरकारने त्या आदेशाला आव्हान […]

Read More

लशी संपत आल्या, राजकारण सुरु

       महाराष्ट्रात करोना धुमाकूळ घालतो आहे. आणि  इकडे लशी संपत चालल्या आहेत. लस  नाही म्हणून अनेक  केंद्रे  बंद पडली आहेत. नागपूर, मुंबईसारख्या शहरात तर फक्त दीड दिवसाचा साठा  आहे. रेम्डेसिवीर  इंजेक्शनचाही  तुटवडा आहे. ते काळ्या बाजारात  तिप्पट भावाने विकले जात आहे.  सरकारी-खासगी रुग्णालयांमधला  सावळागोंधळ संपायला तयार नाही.  नागपुरात बेड न मिळाल्याने एक इसमाचा रुग्णवाहिकेतच मृत्यू […]

Read More

नितीन गडकरींनी कोणाला टोचले इंजेक्शन?

तब्येतीच्या कारणामुळे म्हणा  किंवा  जबाबदारी वाढली म्हणून म्हणा, केंद्रीय  मंत्री नितीन  गडकरी आजकाल मवाळ झाले  अशी त्यांच्या  मित्रांची तक्रार असते. पण भाजपच्या स्थापना  दिनानिमित्त नागपुरात झालेल्या कार्यक्रमात  त्यांना ऐकले. आणि जुने गडकरी परत येत चालले  असे  संकेत मिळाले.             ‘जातीपातीचे, गटातटाचे राजकारण नको’  अशा शब्दात त्यांनी  कार्यकर्त्यांना  तंबी दिली.   संदीप जोशींची निवडणूक  भाजप हरला,  जिल्हा […]

Read More

दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री

       अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे  हादरलेल्या राष्ट्रवादीने काही तासातच स्वतःला  सावरले आहे.  शरद पवारांनी झटपट  निर्णय केला. त्यांनी आपले सर्वात विश्वासू  सहकारी  दिलीप वळसे पाटील यांना निवडले. दिलीप वळसे-पाटील हे  नवे गृहमंत्री म्हणून उद्या म्हणजे  सोमवारी  सकाळी शपथ घेतील.    त्यांच्याकडचे उत्पादन शुल्क खाते  अजित पवारांच्याकडे तर कामगार खाते हसन मुश्रीफ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून देण्यात […]

Read More

एक हजार कोटी रु.मोजून खरेदी केले घर

इंदिरा गांधींनी  १९७१ च्या निवडणुकीत  ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. गरिबी हटली की गरीबच हटले ते आपण पाहत आहोतच.  पण इथे आठवण यासाठी, की त्या घोषणेला  ५० वर्षे पूर्ण होत आहेत.  त्या मुहूर्तावर एका अब्जोपतीने मुंबईमध्ये मलबार हिल भागात   एक हजार कोटी रुपये मोजून एक घर विकत घेतल्याची बातमी आली. हा नियतीचा अजब न्याय म्हणावा लागेल. […]

Read More

आणखी किती शहीद हवेत? माओवाद्यांना ठेचणार तरी कसे?

छत्तीसगडने  पुन्हा एक महाभयंकर माओवादी हल्ला पाहिला. विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवरील जंगल  शनिवारी  भर दिवसा पेटले.   माओवाद्यांशी झालेल्या   सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलाचे तब्बल २२  जवान मारले गेले.  जोनागुंडाचा  हा डोंगराळ भाग  माओवाद्यांचा मोठा अड्डा आहे. कुख्यात  हिड्मा मडावी  इथे असल्याची माहिती मिळाल्यावरून   मोठे ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. काहीतरी गडबड झाली.  जवान घेरल्या गेले.  देश हादरला. […]

Read More

घरी दोन पेशंट, तरीही उद्धव ठाकरे कामात व्यस्त

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करण्याची  संधी फार कमी येते.  सध्या करोनाच्या संकटात ते ज्या हिंमतीने राज्याचा  कारभार चालवत आहेत ती  नक्कीच कौतुकास्पद आहे.  आरोग्य यंत्रणा सक्षम करायची म्हटले तर पैसा पाहिजे.  सरकारच्या खजिन्यात तर खडखडाट आहे.  त्यामुळे ते विरोधकांच्या टीकेचे टार्गेटही होत आहेत.  तरीही कुठे त्यांचा तोल गेलेला दिसला नाही.  राज्यात दररोज  करोना रुग्णांच्या […]

Read More

मोदींना ममता ठोकणार?

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि  पुद्दुचेरी  ह्या पाच राज्यांमध्ये सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे.  यातले आसाम सोडले तर कुठेही भाजपची सत्ता नाही.  त्यामुळे ह्या निवडणुकांचे निकाल  पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या लोकप्रियतेचे थर्मामिटर  असेल. मोदींच्या कारभारावर  जनता खुश आहे का?   जनमताचा कौल  या निवडणुकांच्या निकालातून  मिळणार आहे.  चुरस पाचही  राज्यात आहे. पण  बंगालमध्ये आरपारची लढाई […]

Read More

हायकोर्टाने परमबीर यांना झापले

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी  सचिन वाझे याला १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते असा  आरोप करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहून  मुंबईचे  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी  खळबळ उडवून दिली होती.  महाआघाडी  सरकार त्यामुळे  खूप  संकटात सापडले होते.  आपल्या ह्या  आरोपाची सीबीआय चौकशी  करावी अशी मागणी करणारी  जनहित याचिका घेऊन  परमबीर सिंग  मुंबई […]

Read More

पवार-भाजप जवळीक वाढतेय

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार आणि   भाजपचे चाणक्य  अमित  शहा यांची नुकतीच भेट झाली की नाही हे अजूनही रहस्य आहे.   त्यांची भेट झाली असेल किंवा नसेलही. पण एक स्पष्ट आहे.  पवार आणि भाजप यांच्यातली जवळीक वाढते आहे.  दोस्ताना वाढतो आहे. तसा हा दोस्ताना २०१४ मध्येही दिसला होता.  निकाल पूर्ण लागायचे असताना पवारांनी   सरकार बनवण्यासाठी भाजपला पाठिंबा  […]

Read More