१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..! ज्ञानेश वाकुडकर

आपल्या इमानदारीच्या व्याख्या एवढ्या भोंगळ आहेत, की त्या बघून आपण भोळे आहोत की मूर्ख, हेच कळत नाही ! पोलीस खात्यामध्ये वसुली होणार नाही, अशी कल्पना तरी आपल्याला करता येईल का ? अगदी आर. आर. पाटील गृहमंत्री होते, तेव्हा सुद्धा पोलीस खाते स्वच्छ आणि पवित्र झाले होते, अशी खात्री आपण देवू शकतो का ? यात आबा […]

Read More

पूजा ते दीपाली…आणखी किती निर्भया?

अमरावती जिल्ह्यातल्या  मेळघाटातल्या   वनपरिक्षेत्र अधिकारी  दीपाली चव्हाण  यांनी  बंदुकीची गोळी घालून केलेल्या आत्महत्येने  वन विभागच नव्हे तर  सारे राज्य हादरले आहे. ३५ वर्षे वयाच्या ह्या महिला अधिकाऱ्याने  आत्महत्येपूर्वी एक पत्र लिहून ठेवले.   वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून  आत्महत्या करीत असल्याचे लिहून ठेवले.   दोन अधिकाऱ्यांची नावेही लिहिली. त्यातल्या एकाला  निलंबित करून अटक  झाली तर दुसऱ्याची  बदली करण्यात आली. […]

Read More

शरद पवार ह्या वयात गद्दार होतील?

राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी    भाजपचे चाणक्य  अमित शहा  यांची गुप्त भेट  घेतल्याच्या बातमीने  खळबळ आहे.  दोन दिवसांपूर्वी अहमदाबाद येथे ही भेट झाल्याची बातमी एका गुजराती  वृत्तपत्राने  दिली आहे.  राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी  अशी काही भेट झाल्याचा इन्कार केला.  पवारांची प्रतिक्रिया अजून आलेली नाही.  शहा मात्र बोलले. ‘राजकारणात सारं काही  सांगायचं नसतं’    असे शहा […]

Read More

‘कुणी बेड देता का बेड’

‘नटसम्राट’ नाटकात   श्रीराम    लागू  ‘कुणी घर देता का घर’   असा टाहो फोडतात  तेव्हा  काळीज फाटते.  करोना महामारीच्या   पार्श्वभूमीवर  राज्यात सध्या तेच चित्र आहे.  नागपूर आणि औरंगाबाद  येथे तर  आरोग्य  यंत्रणाच  व्हेंटीलेटरवर आहे.  ‘कुणी बेड देता का बेड’  म्हणत  करोनाबाधितांचे नातलग   रुग्णालये पालथी घालत आहेत. पण सरकारी  रुग्णालयात बेड मिळत नाही. खासगी  रुग्णालयात  जायचे झाले तर […]

Read More

आपण विषारी भाज्या खातो

तुम्हाला कल्पना नसेल. पण   तुम्ही दररोज  भाज्यांसोबत थोडेय्होडे विषही खात असता.  आधीची पिढी रेशनचे धान्य खून  पोसली गेली. आताची पिढी   कीटकनाशके खाते आहे.  ‘आम्ही कधी डॉक्टर पहिला नाही’ असे सांगणारे  अनेक माणसे गेल्या पिढीत  सापडतील   आताची पिढीच्या  तर पहिल्याच वर्षात   दवाखान्याच्या चकरा सुरु होतात.  पेराल ते उगवेल. त्या प्रमाणे तुम्ही जे खाल  तसे  निघाल.  बालक […]

Read More

पवारांना राष्ट्रपती व्हायचंय की युपीए अध्यक्ष?

                    राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार  यांना  कायम न्यूजमध्ये राहण्याची कला छान  साधली आहे.  तशी माणसे त्यांनी  ठेवली आहेत.   काहीतरी सनसनाटी  बोलून पवारांचे महात्म्य  वाढवण्याच्या खटपटीत ही माणसे असतात.  आता  आपले संजय राऊत  पहा. वाहिन्यांना बाईट दिल्याशिवाय  त्यांना करमत नाही.  शिवसेनेचे खासदार आहेत. शिवसेना युपीएमध्ये नाही. पण वकिली पवारांची करतात.  पवारांनी युपीएचे म्हणजे संयुक्त पुरोगामी  आघाडीचे […]

Read More

उद्धव सरकारचा गेम होणार?

सरकार बनवायला आमदारांचे बहुमत लागते. पण सरकार चालवायला अधिकाऱ्यांचे  बहुमत लागते. महाराष्ट्रात सध्या हेच पाहायला मिळते आहे.  अधिकाऱ्यांकडून मिळवलेली माहिती घेऊन  विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस  फटाके फोडत आहेत. आमदार फोडता येत नाहीत म्हणून भाजपने   अधिकाऱ्यांना हाताशी धरले आहे. परमबीर सिंग  आणि रश्मी शुक्ला  भाजपच्या मदतीला आलेले दिसतात.  दोन महिन्यापासून  सत्ताधारी आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु […]

Read More

एक ते दीड वर्ष मास्क घालायचाच आहे

             करोना नेहमीसाठी पाहुणा बनून आला आहे.  प्रत्येकाला हे जाणवत होते. तरीही वैताग  होता. केव्हा जाणार करोना?  केव्हा मरणार करोना?   केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज हे  कोडे थोडे उलगडले.   ‘एक ते दीड वर्ष    मास्क तर घालायचाच आहे’ असे जावडेकर म्हणाले.    सुरक्षित अंतर राखायचे आहे,  हात  धुण्याची सवयही ठेवायची आहे असेही त्यांनी सांगितले.  म्हणजे आणखी […]

Read More

‘सचिन वाझे मरत नसतात’

३५ वर्षापूर्वी  बोफोर्स  घोटाळ्याने सारा देश ढवळून निघाला  होता.  ह्या बोफोर्स तोफा सौद्याने राजीव गांधी  यांचे सरकार खाल्ले.  त्या घोटाळ्याचा आरोप होता फक्त ६५ कोटी रुपयांचा. पण बघता बघता  बोफोत्स हा भ्रष्टाचाराचा प्रतिशब्द बनला. पण म्हणून  घोटाळे, घोटाळ्यांचे आरोप थांबले नाहीत.  आपल्या देशात  भ्रष्टाचाराची प्रकरणे  घडतात, गाजतात आणि  काही दिवसांनी जणू काही घडलेच नाही अशा […]

Read More

अनिल देशमुखांना वाचवण्यासाठी धावले शरद पवार

शरद पवार प्रत्येक निवडणूक  जिंकत आले. पराभव त्यांना माहित नाही. पण आज त्यांची फजिती झाली. आपले गृहमंत्री अनिल देशमुख यांना वाचवण्याची धडपड त्यांच्या अंगाशी आली. ‘मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या  खळबळजनक पत्रानंतर  महाआघाडी सरकार संकटात  आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांची खुर्ची  धोक्यात आहे. सचिन वाझे देशमुखांना भेटला की नाही हा कळीचा मुद्दा बनला […]

Read More