यवतमाळ व अमरावतीमध्ये करोनाचा नवा अवतार

                करोनाबाधितांची संख्या वाढत आहे.  विदर्भातील  यवतमाळ, अमरावती आणि अकोला शहरांमध्ये  चिंता करावी असे वातावरण आहे.  यवतमाळ एका आणि अमरावतीच्या  चार रुग्णांमध्ये  करोनाचा नवा स्ट्रेन  सापडल्याने चिंता वाढली आहे.   मात्र हा  विषाणू युकेतला नाही,  भारतीय आहे  अशी माहिती मिळाली.  त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही . पण  हा संसर्ग पसरू नये म्हणून प्रशासनाने  कडक निर्बंध  लावले […]

 162 Total Likes and Views

Read More

कुणालाही कधीही येऊ शकतो हार्टचा झटका

ह्रदय विकाराचा झटका ही आता श्रीमंतांची मक्तेदारी राहिलेली नाही. चाळीशीनंतरच ह्रदय विकार मागे लागतो अशातलाही विषय राहिलेला नाही. हार्टच्या आजाराला आता वयाचेही बंधन राहिलेले नाही. कुणालाही आणि कधीही आता हार्टचा प्रॉब्लेम सुरु होऊ शकतो. त्यामुळे सावध व्हा. कुठलीही लक्षणे नसताना अचानक हार्टच्या झटक्याने मृत्यूने गाठल्याची उदाहरणे समोर येत आहेत. समाजाने काळजी करावी असे सिग्नल्स मिळू […]

 196 Total Likes and Views

Read More

मोदी शेतकऱ्यांपुढे झुकतील?

दिल्लीच्या रस्त्यांना आंदोलनाची सवय होत चालली आहे की काय असा प्रश्न पडतो. तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी गेल्या ४० दिवसापासून दिल्लीच्या सीमेवर रस्ते अडवून बसले आहेत. मोदी सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या सात फेऱ्या झाल्या. पण सरकार झुकायला तयार नाही. दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. शेतीचे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत […]

 154 Total Likes and Views

Read More

का रडवतो कांदा?

          कांदा कडाडला आहे.  आताच तो १०० रुपये किलो भावाने विकला जात आहे. येत्या दिवाळीपर्यंत तो १५० रुपये किलोपर्यंत वाढू शकतो. परतीच्या पावसाचा फटका  कांद्यालाही बसला. त्यामुळे अचानक तुटवडा निर्माण होऊन कांद्याचे भाव वधारले आहेत. पुढच्या महिन्यात जो नवा कांदा येईल, तोही कमी असेल.  दोन महिन्यापूर्वी २० रुपये किलो भावाने कांद्याची विक्री सुरु होती. पण […]

 169 Total Likes and Views

Read More

‘नाना’गिरीने विदर्भ जोरात

अवघ्या २० वर्षांच्या राजकीय आयुष्यात मोठी वादळं अंगावर झेलत आलेल्या नाना पटोले यांना नव्या सत्तास्थापनेत विधानसभा अध्यक्षपद देतील असे कुणालाही वाटले नव्हते. ‘तुम्हाला कृषिमंत्रिपद मिळेल असे वाटले होते’ असे खुद्द विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन करताना विधानसभेत केलेल्या भाषणात म्हटले. खरेच आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव ह्या खुर्चीसाठी ठरले होते. पण […]

 162 Total Likes and Views

Read More

खातेवाटपाची भांडणे संपली नाहीत

सत्तास्थापनेच्या १५ दिवसानंतर महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप झाले खरे. पण तिढा सुटलेला नाही. गृह आणि नगर विकास खात्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीत खूप रस्सीखेच आहे. नागपूर अधिवेशनाच्या तोंडावर कलह टाळण्यासाठी तात्पुरते खातेवाटप जाहीर करण्यात आले. महाआघाडीच्या सारे आलबेल नाही. डिसेंबरअखेर मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा कलह भडकेल. जयंत पाटील यांचे समर्थक गृह खाते सोडायला तयार नाहीत आणि […]

 160 Total Likes and Views

Read More

विधानसभेचा आखाडा आणि उद्धवनीती

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवसाचा मूड पाहिला तर विधानसभेचा आखाडा होतो की काय अशी भीती वाटली. नागपुरात थंडी आहे. पण विधानभवन तापले आहे. राहुल गांधी विधानसभेचे सदस्य नाहीत. पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल त्यांनी गेल्या आठवड्यात केलेल्या अपमानास्पद वक्तव्यामुळे भाजप आमदारांच्या हाती आयते हत्यार आले आहे. विधानभवनात आत-बाहेर सावरकरच सावरकर चालले. ‘मी पण सावरकर’ असे […]

 199 Total Likes and Views

Read More

एकही दादा, अजितदादा !

बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधले दुसऱ्या क्रमांकाचे नेते अजितदादा पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने म्हणजे एसीबीने क्लीन चिट दिली आहे. तीन दिवसांच्या सरकारच्या राजीनाम्यानंतर एसीबीच्या नागपूरच्या अधिकाऱ्याने अजितदादांना क्लीन चिट दिली होती. आता एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग यांनी मोठा दिलासा दिला. सरकार वाकते. वाकवणारा पाहिजे, असे काही आहे का? महाविकास आघाडीच्या राज्यात क्लीन चिट स्वस्त […]

 144 Total Likes and Views

Read More