कॉन्ग्रेसला देणग्या मिळेनात

करोना संकटात   जनसामान्यांचे बजेट कोलमडले आहे.  पैशाची  चणचण  भासू लागली आहे.  सामान्य माणसासारखीच अशी अवस्था कॉन्ग्रेस पक्षाचीही झाली आहे.   देशाची सत्ता गेल्याने  कॉन्ग्रेसला    देणग्या मिळणे खूपच कमी झाले आहे.  कार्पोरेट क्षेत्राकडून २०१२-१३ ते २०१८-१९  या काळात  कॉन्ग्रेसला फक्त ३७६ कोटी रुपये देणगी स्वरुपात मिळाले.  या काळात  भाजपला २३०० कोटी रुपये मिळाले.   राष्ट्रवादीला ६९ कोटी रुपये […]

Read More

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावेळी तरी नवा सरकार्यवाह देईल काय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ  सहसा बदलायला तयार नसतो.   हिंदू, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र.. त्यांची विचारांची बैठक ठरली आहे.   गणवेश बदलायला  किती खळखळ केली? पण मोहन भागवतांनी  गणवेश बदलून घेतला.  तसाच पेच आता आहे.  संघाची दोन दिवसांची  अखिल भारतीय  प्रतिनिधी सभा   आजपासून कर्नाटकात  बेंगळूरू येथे सुरु झाली.    तिच्यात  संघाचा नवा  जनरल सेक्रेटरी म्हणजे सरकार्यवाह  निवडला जाणार आहे.  निवड […]

Read More

यवतमाळ व अमरावतीमध्ये करोनाचा नवा अवतार

                करोनाबाधितांची संख्या वाढत आहे.  विदर्भातील  यवतमाळ, अमरावती आणि अकोला शहरांमध्ये  चिंता करावी असे वातावरण आहे.  यवतमाळ एका आणि अमरावतीच्या  चार रुग्णांमध्ये  करोनाचा नवा स्ट्रेन  सापडल्याने चिंता वाढली आहे.   मात्र हा  विषाणू युकेतला नाही,  भारतीय आहे  अशी माहिती मिळाली.  त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही . पण  हा संसर्ग पसरू नये म्हणून प्रशासनाने  कडक निर्बंध  लावले […]

Read More

महागाईची लोकांना सवय झाली?

लवकरच तुमच्या मोबाईलवर कॉलर ट्यून  येईल…धीरगंभीर आवाजात अमिताभ बच्चन म्हणेल, ‘महागाई एक आजार आहे.  तो टाळा. जेवण कमी करा.  फाटलेले कपडे घाला.  पायी चाला.  पेट्रोल वापरू नका.  लक्षात ठेवा.  आपल्याला महागाईसोबत लढायचे आहे,  सरकारसोबत नाही.’ महागाईचे  कोरोनासारखे झाले आहे.  जायला तयार नाही.  महागाई  पिच्छा सोडायला तयार नाही.  दिवसेंदिवस वाढत आहे.  पेट्रोल  सेंच्युरी मारत आहे.  स्वयंपाकाचे […]

Read More

कोरोनाचा धोका वाढला अमरावतीत रविवारी लॉकडाऊन

कोरोनासोबतच आपल्याला राहायचे, जगायचे आहे  असे एकूण दिसते. दिवाळीच्या सुमाराला कोरोनाची  दुसरी लाट  रोखण्यात बरेचसे यश आले होते.  बाधितांची संख्याही कमी झाली होती. लसीकरणाची मोहीम हाती घेतल्याने  कोरोना  गेला अशी हवा तयार झाली होती.  त्यामुळे लोक बिनधास्त होऊन फिरू लागले होते.  त्यामुळे  की काय,  कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.   बाधितांची वाढती संख्या पहाता   दुसरी […]

Read More

पुन्हा लॉकडाऊन होणार?

करोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने राज्याला पुन्हा  लॉकडाऊनकडे जावे लागेल  अशी लक्षणे  दिसत आहेत.  लोकांनी नियम पाळले नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आरोग्यमंत्री  राजेश टोपे  या दोघांनी आज एकसुरात दिला.  अजितदादा उद्या  म्हणजे मंगळवारी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांना या संबंधात भेटणार आहेत. काही नवा निर्णय झाला तरी तो […]

Read More

मंत्री राठोड यांचा ‘मुंडे होणार’ की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रामशास्त्री होणार?

‘सामना’ सिनेमात निळू फुले यांच्या तोंडी एक  यादगार डायलॉग आहे…मारोती कांबळेचं काय झालं? हा मारोती तर केव्हाच गेला.  निळूभाऊही आपल्यात नाहीत.  पण तोच प्रश्न पात्र बदलून विचारण्याची पाळी  जनतेवर आली आहे… ‘पूजा चव्हाणचं काय झालं?’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सखोल चौकशी केली जाईल आणि जे काही सत्य आहे ते  बाहेर येईल.’  भाजप नेते देवेंद्र फडणवीस […]

Read More

राज्यपालांचे धोतर सोडणे बाकी ठेवले

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना  महाराष्ट्र सरकारने विमान नाकारल्याने राजकारणाला उकळ्या फुटत आहेत.   कोश्यारी आणि  महाराष्ट्र सरकार म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष लपलेला  नाही.  ह्या सरकारने शपथ घेतल्याच्या दिवसापासून  खडाखडी सुरु आहे.  नळावर बायका भांडतात तसे भांडताहेत.  राज्यपालांना  विमानातून उतरवून  देण्याचा प्रकार  अनपेक्षित नाही.  दोघेही टिकले तर भविष्यात  ह्या पेक्षा भयंकर घडू शकते.  व्हराडी  […]

Read More

पुजाची आत्महत्या, आता कोणता मंत्री अडकणार?

बुवा तेथे बाया.  मग मंत्री तेथे काय?  पूर्वी राजकारणी पैशाच्या भानगडीत बदनाम व्हायचे.  आता बाईच्या  भानगडीत  त्यांच्या नावाची चर्चा होते.  गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे   मंत्री धनंजय मुंडे  यांचे नाव चालले. पुढे त्या महिलेनेच तक्रार मागे घेतल्याने  मामला मिटला. आता पूजा चव्हाण नावाच्या  परळीच्या एका तरुणीच्या  आत्महत्येने राज्यात खळबळ आहे.  या आत्महत्येशी संबंध लावला जात असलेल्या  ज्या […]

Read More

सरकारने राज्यपाल कोश्यारी यांना विमानातून उतरवले

राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी  आणि  महाविकास आघाडी  सरकार  यांच्यातील संघर्ष  लपून राहिलेला नाही.  गुरुवारी  तो चांगलाच चिघळला.  कोश्यारी  राज्य सरकारच्या विमानाने  डेहराडूनला जाणार होते.   पण सरकारने त्यांना परवानगी नाकारली.  कोश्यारी यांना असे काही होईल याची कल्पना नसावी.  ते सरळ  विमानात जाऊन बसले.  काही वेळाने त्यांना  वास्तव कळले. नन्तर दुपारी त्यांनी प्रवासी विमान पकडले. या प्रकारावर […]

Read More